सध्याचा project संपला, आता नवीन assign झालाय…
पुन्हा relocation, नवीन जागा, नवीन माणसं…
खरं तर 3 वर्ष झाले ही company join करून, पण join केल्यापासून एकाच building मध्ये अन एकाच floor वर होते..सगळे चेहरे,meeting rooms, cubicles ओळखीचे..

आता जागेसोबत जग बदलणार…

असंच काहीसं किंवा ह्याहूनही जास्त emotional व्हायला झालं होतं ह्या आधीची company सोडतांना..
हम्म.. Reliance.. DAKC.. पहीला job, पहीली company… त्यामुळे अजूनच स्पेशल..
हजार आठवणी जुडलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसोबत …
विसरता विसरल्या जात नाही तिथला शेवटचा दिवस अन esp तो क्षण जेव्हा ID card परत केलं होतं…
एका  ओळखीचा, अस्तित्वाचा अंत..
तिथल्या जगातली ओळख..तिथल्या जगाचं अस्तित्व…gate च्या बाहेर शेवटचं पडतांना मागे वळून बघायची हिंमत झालीच नाही..rather केलीच नाही..
आजही मुंबईला जाणं झालं की पनवेल ते कोपरखैरणे रस्ता सगळं काही जसंच्या तसं डोळ्यासमोर आणतो…
सगळं जुनं झालंय…आठवणी मात्र अजूनही नव्याच…

किती तरी अशी लहान-मोठी जगं मागे सुटून गेलीयेत अन अजूनही सुटतायेत..
शाळा, कॉलेज, पहीली company पहीला/दूसरा/तीसरा project/team…बरंच काही…

अन सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा असल्या कधी काळी ‘तुमच्या’ असलेल्या जगात तुमचं जाणं होतं अन भोवताली कुणालाच हे जग कधी काळी ‘तुमचं’ होतं ह्याची अजिबात जाणीव नसते…ओरडून सांगावसं वाटतं पण त्यासाठीही आपण आपले उरलेले नसतो…

…..

सगळेच बंध शब्दात व्यक्त करता येत नाहीत…हेच खरं…

परवा T.V. बघताना (खरं तर नुसती हे channel, ते channel अशी वारी सुरु होती) एका कार्यक्रमाच्या जाहिरातीमाध्ये सुकन्या कुलकर्णी दिसल्या. मला त्यांचे नावच आठवेना. खूप खूप प्रयत्न केला आठवण्याचा, एवढा की त्या लहरीत lil champs मनापासून बघणं झालं नाही. असंच होतं, एखादी गोष्ट अशी अचानक विसरायला झाली की ती आठवेपर्यंत चैन पडत नाही. कधी कधी तर स्वप्नात मला उत्तरं मिळतात. अर्थात ‘माझी स्वप्नं’ ह्या title चा एक नवीन blog सुरु करता येइल.. ;)

हा तर सुकन्या…खूप वेळ हा भुंगा भुण भुण करत होता…गुगलायाचा विचार आला पण झटकून टाकला..एवढंही नको आहारी जायला..देउया स्मरणशक्तीला थोडा ताण. ह्यासाठीच मी कधीच कुठल्या गोष्टीसाठी reminder लावत नाही..नैसर्गिक देणग्यांवर उगाच गंज का चढवा?

काही वेळाने hint मिळाली की ‘सु’ वरून नाव सुरु होते…मग नवीन thread सुरु झाला..सुलोचना..नाही, सुनयना..नाही,…मध्येच वाटायला लागलं की ही hint आपला शोध चुकीच्या दिशेला नेत तर नाहीये ना..? पण कुठे तरी strong intuition होतं, hint बरोबर असल्याचा…पण गाडी तिथून पुढे काही जाईना. गुगलायचं?…नको.

४-५ वेळा निरर्थक प्रयत्न करून बघितला विषय थोड्या वेळासाठी डोक्यातून काढून टाकण्याचा..मग अचानक कुठून तरी tube पेटली..”कुलकर्णी”. मग पुन्हा नवीन thread… “सु” वरून सुरु होणारी नावं आणि “कुलकर्णी” ह्यांच्या जोड्या लाउन कुठली जोड़ी click होते ते बघण्याचा..गुंता नुसता.

इतका वेळ background ला “आभाळमाया” चे title track सुरु होतेच.

शेवटी न रहावून गूगल देवाला शरण गेलेच…टाकला search “आभाळमाया cast”… लगेच उत्तर मिळालं..”सुकन्या कुलकर्णी”…काय शांती लाभली जीवाला, शब्दात मांडणे अशक्य…३०-४० mins सुरु असलेलं वादळ गुगलने शमवलं होतं..काय पण औषध आहे! मला म्हणूनच ‘गूगल’ अन ते ‘गुग्गुळ’ (आयुर्वेदीक गोळ्या) नातेवाईक वाटतात… :)

काही दिवसांपुर्वी….

वेळ: संध्याकाळचे ७,७:३०
मी: उशीर होणारे?
नमान (नवरा माझा नवसाचा :) ):  :(
मी: किती?
नमान: माहीत नाही :(
मी: तरी साधारण?
नमान: अर्धा तास साधारण…
मी: मग थांबते मी, सोबतच निघुया (हे माहीत असूनही की ह्याचा अर्धा तास=ब्रम्हदेवाचा अर्धा तास)
वेळ: ८,८:१५
मी: झाले का?
नमान: :(
मी: ?
नमान: १० mins?
मी (त्रासिक): ठीक आहे..
वेळ: ८:३०
मी: ??
नमान: ५ mins.. :(
मी: नाही होणार तुझे ५ मिनिटात…
नमान: :(
वेळ: ८:४५
मी: ???
नमान: चल.. झाले..
मी: ok, ये लवकर खाली, मी निघाले आहे..
नमान: ok
मी: bye, sign-out कर.
नमान: हो…करतो, bye.
नमान offline होतो.
२ mins नंतर..
नमानच्या desk वरचा phone वाजतो..
नमान phone घेतो..
इकडून मी: अजून तिथेच आहेस ना?
नमान: अग निघालोच होतो, phone वाजला म्हणून परत आलो…
मी: माहीतीये, माहीतीये…निघ आता..
नमान: हो..phone ठेव म्हणजे निघतो..
phone cut…

काल-परवा…

वेळ: संध्याकाळचे ७,७:३०
नमान: निघायचं?
मी: :(
नमान: ?
मी: १० mins?
नमान: ok :(
वेळ: ८,८:१५
नमान: झाले का?
मी: :(
नमान: ??
मी: ५ mins.. :(
नमान: नाही होणार तुझे ५ मिनिटात…
मी: :(
वेळ: ८:३०
नमान: ???
मी: चल.. झाले..
नमान: ok, ये लवकर खाली, मी निघालो आहे..
मी: ok
नमान: bye, sign-out कर.
मी: हो…करते, bye.
मी offline होते.
२ mins नंतर..
माझ्या desk वरचा phone वाजतो..
मी phone घेते..
तिकडून नमान: अजून तिथेच आहेस ना?
मी: अरे निघालेच होते, phone वाजला म्हणून परत आले…
नमान: माहीतीये, माहीतीये…निघ आता..
मी: हो..phone ठेव म्हणजे निघते..
phone cut… :)

तात्पर्य: जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर… :D

निघते आता..फळाचा भाग repeat होऊ बघतोय…

Swine Flu साठी DOs & DONTs, precautionary measures/tips असे काही लिहीण्याचा उद्देश नाहीये. फक्त ह्या निमित्ताने आजू-बाजूला जाणवणारे ’निरीक्षण आणि गणन’ share करावेसे वाटले:

१. कालपर्यंत दुर्लक्ष करणारे लोक आज जागरूक झालेत. खंत एवढीच की ही जाग येण्यासाठी कुणाचा तरी बळी जाण्याची वेळ यावी लागली.
२. जवळपास सगळेच कुठलंसं भय चेह-यावर घेउन वावरतायेत.
३. आयुष्यातील इतर real/virtual tensions लोक तेवढ्यापुरती का असेनात पण विसरलेत अन ह्या क्षणात जगतायेत.
४. आपल्या ‘near-n-dear’ onesचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे ह्याचा विचार कळत-नकळत प्रत्येक जण करू लागलंय (असं मला तरी वाटतंय)
५. कोण-कोणत्या गोष्टीचं राजकारण होऊ शकतं ह्या यादीत अजून एका item ची entry.
६. जगणं सोपं राहीलं नाहीये, एकामागून एक नवीन समस्या जन्माला यायला लागल्या आहेत ही जाणीव दिवसेंदिवस वाढत चाललीये.
७. ‘पुढच्या पीढीचं कसं होणार?’ हां अनुत्तरीत प्रश्न पुन्हा भुणभुणायला लागलाय.
८. ‘तहान लागल्यावर विहीर खणायची’ प्रवृत्ती अगदी generic आहे..सरकारी पातळीपासून, वैयक्तीक पातळीपर्यंत.
९. ‘आतासाठी problem fix करू’ हीच बहुतेक tendency…
१०. आयुष्य ‘अनमोल’ अन ‘कवडीमोल’ कसं झालंय ह्या दोन विरुद्ध टोकांची जाणीव एकाच अनुभवात…सगळंच विचित्र झालंय :(

नैसर्गिक अन कृत्रिम दोन्ही बदलांना सामोरं जाता जाता माणूस शेवटी ‘माणूस’ रहावा…बस…

Gtalk वर आज एकीची status line वाचली….”Presence is more than just being there”…click झाली :) असतात ना काही काही वाक्यं अशी, वाचली की एकदम पटतात…घंटा वाजते sort of..हे वाक्यही तशीच घंटा वाजवून गेलं..

किती लोक सोबत असूनही ‘सोबत’ असतात? हया virtual सोबतीचा त्रास  ज्याला होतो तो म्हणजे ज्याला खरी ‘सोबत’ हवी असते, rather सोबतीचा अर्थ कळतो. चालतं-बोलतं माणूस तुमच्यासमोर असतांना कसं काय कुणी तिथं असूनही नसू शकतं? पहीलं तर एकमेकाना द्यायला आजकाल कितीसा असा वेळ मिळतो, मग जेवढा मिळतोय तो तरी व्यवस्थित द्या न समोरच्याला. खूप जीवंत करता येतात असे क्षण…दोनही पुरे असतात..महत्त्वाचं, जेवढी सोबत देता तेवढी प्रामाणिक द्या, आतून द्या…This gives true meaning to life,तुमच्याही अन समोराच्याच्याही.

असतील हजार चिंता, दिवसभराचा थकवा…विसरा ज़रा तेवढ्यापुरता. थोडा वेळ द्या नव-याला/बायकोला, आईला-वडीलांना, पोरं-बाळांना. त्यांचं ‘असणं’ असं ग्राह्य धरू   नका, आयुष्य खूप unpredictable झालंय…कुणीही इथून जाण्याआधी तुम्हाला विचारून/सांगून जाणार नाही की “बाबा रे, काही बोलायचं राहून गेलं असेल तर बोलून घे चार-दोन गोष्टी, मी निघालो आहे…कायमचा…”

माणूस गेल्यावर तयार होणारी पोकळी भरलीये कधी?
पुनर्जन्माचे फेरे असू दे, नसू दे…ह्या जन्माला तरी सार्थकी लाव..

ऋणानुबंध असेच तर जन्माला येतात…

गुलज़ार…काय म्हणावं ह्या माणसाबद्दल, शब्द सापडत नाहीत.
कदाचित फक्त त्यालाच ते शब्द सापडतील स्वत:बद्दल लिहायला…
असो..तो एक वेगळा भाग..

गुलजारनी लिहीलेली अनेक गाणी favourite list मध्ये आहेत पण सगळ्यात पहीलं डोक्यात येतं ते म्हणजे जुन्या ‘खामोशी’ मधलं ‘हमने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू…’.

हमने देखी हैं इन आँखों की महकती खुशबू,
हात से छूके इसे रिश्तो का इल्जाम न दो
सिर्फ एहसास हैं ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…

प्यार कोई बोल नहीं, प्यार आवाज नहीं,
एक खामोशी हैं सुनती हैं कहा करती हैं
ना ये बुझती हैं ना रुकती हैं ना ठहरी हैं कही
नूर की बूंद हैं सदीयों से बहा करती हैं
सिर्फ एहसास हैं ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…

मुस्कुराहट सी खिली रहती हैं आँखों में  कही
और पलकों पे उजाले से छुपे रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं, कापते होंठों पे मगर
कितने खामोश से अफसाने रुके रहते हैं
सिर्फ एहसास हैं ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो…

प्रेमाचं एवढं पवित्र वर्णन कसं काय करू शकतं कुणी? अगदी PERFECT. म्हणजे ऐकणा-याला/वाचणा-याला असं वाटावं की वापरलेला प्रत्येक शब्द फक्त ह्याच गाण्यासाठी जन्माला आला असावा. त्या-त्या शब्दाची जागा फक्त त्याच शब्दासाठी…

“..सिर्फ एहसास हैं ये रूह से महसूस करो…”
ख-या अर्थानी soulmate बनवणारं प्रेम, अद्वैत असण्याची feeling

“..प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो..”
नात्याला नाव मिळाले की बदलत जाणारे संदर्भ

“..एक खामोशी हैं सुनती हैं कहा करती हैं..”
ह्या ओळीसाठी मी पुन्हा नि:शब्द!

शेवटचं कडवं ४ ओळीत ख-या प्रेमात पडलेल्या व्यक्तीची सगळी मन:स्थिती to-the-point सांगून जातं.

………………

इथून पुढं काही लिहीवत नाहीये…I am rendered speechless…

feeling ‘खामोशी’  :)

Post-lunch ‘सो गया ये cubicle, सो गया वो cubicle’ असे वातावरण असतांना अचानक तुम्हाला एक ‘महत्त्वाची’ meeting attend करायचीये असा सांगावा येणे म्हणजे काय योग असतो तो ज्याचा त्यालाच माहीत. असाच योग आज होता माझ्या दैनिक भविष्यात. न सांगून जातीये कुठे? conf room मध्ये अजून कुठे?

नेहमीचे आपले technically होरपळून निघालेले ४-५ लोक होते. Attendees पाहून एकंदरीत meeting चा tone लक्षात येतो. असो. सगळं काही असं शांततेत सुरु असतांना आला एक घोळका., घोळका consisiting of only two ‘gals’! सगळं वातावरण क्षणात change! नाटकी बोलणं, न धड ‘भारतीय’- न धड ‘अमरीकी’ उच्चार…बड़ा घर,पोकळ वासा…चीड-चीड नुसती! College च्या gathering ला बसलोय की office च्या meeting ला तेच कळेना. नशीब आमचं, ५ मिनिटात meeting cancel झाली. नाहीतर उरलेला पूर्ण दिवस म्हणजे डोक्यात ठणाणणा.

असे बरेच अनुभव येतात. workhall मध्ये लोक काम करत असतांना ‘> १’ मुली (हो, mainly मुलीच) एका ठीकाणी जमतात आणि मग पूर्ण जगाला कळतं ह्यांनी काल काय केलं, आज काय करतायेत अन उद्याचे काय plans आहेत. केसांचा रंग, मेंदीत घातलेलं दही, हजार प्रकारच्या tips, shopping चे details, अमक्या-तमाक्याबद्दल gossiping……अंत नाही. काही पुरुषमंडळीही कमी करत नाहीत.

मान्य, व्यक्तीस्वातंत्र्य आहे, पण कुठे कसं वागावं ह्याचं तारतम्य नको? तुम्ही office/meeting ला आला आहात, fashion show ला किंवा आठवडेबाजाराला नाही एवढं तर भान ठेवा! ज़रा तरी शिस्त बाळगा. कुणाला मदत करा किंवा नका करू, पण आपल्यामुळे इतरांना त्रास होत नाहीये एवढी तर काळजी नक्की घेऊ शकतो आपण.

Enjoy करायला आहेत की ब-याच जागा, नाही कोण म्हणतंय?

म्हणून गेलंय कुणीतरी, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’…सगळं मान्य, कळतं आणि पटतंही पण वळवून घेणं इतकं का सोपं असतं. तसं झालं असतं तर म्हणी ‘म्हणी’ म्हणवल्या नसत्या ना! ज्या फक्त म्हटल्या जातात अन फक्त म्हणायच्या असतात त्या ‘म्हणी’…

हां, तर ह्या व्यक्ती-प्रकृतीबददल….
रोजच्या आयुष्यात किमान ४ तरी अश्या व्यक्ती असतात ज्यांच्यासोबत तुम्हाला deal करावंच लागतं. त्या चारातून प्रत्येकात काही चांगल्या(म्हणजे आपल्या मनासारख्या) अन काही न पटणा-या गोष्टी आल्याच. व्यक्ती चांगली वागली तर सगळं कसं ‘अहाहा’…अन त्याउलट वागली की होणारी चीड-चीड, मन:स्ताप ज्याचा त्यालाच माहीत. आता ‘मनाविरुद्ध’ एका बाजूला ठेवलं तर समोरच्या व्यक्तीमध्ये खरंच काही काही प्रवृत्ती अश्या असतात की ज्यामुळे चीड-चीड होणं अगदी साहजिक असतं, अगदी valid. अन मग मनात त्या वेळी विचारांची जी maggi  होते ती तुमचा mood अजूनच वाईट करते. तुमचे intentions चांगले, स्वच्छ असूनही हे असं का वागावं? बरं त्यावेळी हीच व्यक्ती कधीतरी खूप चांगली वागते हेही विसरायला होतं.

मन:स्तापाच्या ह्या क्षणामध्ये २ पैकी १ गोष्ट जमायला हवी:
१. स्पष्ट बोलून मोकळं होणं
किंवा
२. Ignore करणं.

अन सुदैव म्हणा की दुर्दैव, मला ह्यातलं एकही जमत नाही :( आणि मग विचार उठत रहातात, चीड-चीड वाढत रहाते, वडाचं तेल वांग्यावर निघत रहातं. प्रत्येक वेळी प्रयत्न करते असं न होऊ देण्याचा, पण अजून तरी यश आलं नाहीये.
पर्याय १ मला आयुष्यात जमणार नाही, तिथं मी बोलाची कढी, बोलाचा भात..बोलाचा अख्खा स्वयंपाक!!!
पर्याय २ साठी भयंकर patience, control लागणारे…पण हे जमण्यासारखं वाटतंय. अन योग्यही…समोरचा विचित्र वागला म्हणून तुम्ही आपल्या एका चांगल्या सवयीचा बळी का द्यावा? समोरच्याला उलट बोलून त्याच रांगेत जाउन बसण्यांत काही अर्थ नाही. स्वत:ला स्वत:च्याच विचारांनी होणारा त्रास तेवढा कमी करायला शिकून घ्यावं त्यापेक्षा…tolerance level improve करा.

शेवटी…मर्जी है आपकी, त्रास तुम्हालाच आणि शांतीही तुम्हालाच… :)

कधी झालंय असं तुमच्यासोबत??

रोजच्या आयुष्यात शेजारून येता-जाता खूपदा दिसणा-या, hi-bye पुरती ओळख असणा-या १०० व्यक्तींपैकी एखाद्याच्या आयुष्यातली धक्कादायक बातमी तुम्हाला कळते अन तुम्हाला काही सुचेनासं होतं.
ती व्यक्ती ज्या दिव्यातून जातीये तिची तुम्ही फक्त म्हणजे फक्त कल्पनाच करू शकता…अर्थात पूर्ण कल्पना करता येणं खूप कठीण…
ती कसं handle करत असेल सगळं, किती खचायला होत असेल तिला, वेळी-अवेळी निघणा-या टीपांना कसं आवरत असेल ती, कुणी तरी आपलं, मायेचं सोबत नेहमी असावं अश्या परिस्थितीत असं लाख वाटूनही क्षणोक्षणी जाणवणारा एकटेपणा कसा पेलवत असेल तिच्याकडून?
सहानूभूतीच्या नजरा तिला रोखत असतील तेव्हा आपल्या दु:खाचा बाजार मांडल्या गेल्यासारखं नसेल का वाटत तिला?
एकाच वेळी आधार हवाही अन जास्त मिळाला तर कदाचित त्याचा वाटणारा तिटकाराही…दोन्ही गोष्टी सहन करता करता किती भयंकर घाल-मेल होत असेल…

किती किती विचार केला तरी काहीतरी खात रहातं…आत आत, खोल खोल…
का घडावं असं कुणाहीसोबत?

अन सगळ्यात बोचरी गोष्ट म्हणजे कितीही इच्छा असली तरी कसा आधार द्यावा अश्या व्यक्तीला ही दुविधावस्था..
सुचेनासं होतं…

तिला बळ देवो ‘तो’ ह्या दिव्यातून जाण्याचं..
पाप-पुण्याचे हिशोब, नशीबाचे फेरे…काही का कारण असेना, बळ दे तिला…

असं काही अनुभवावं लागलं की स्वत: ची सगळी सटर-फटर दु:खं(?) विसरायला होतात…
कशा-कशावर रडत असतो आपण..कुणासाठी इथे एक एक श्वास महत्त्वाचा अन आपण तो असा नको तिथं वाया घालवतो…

कुणीतरी इथं आयुष्याच्या एक-एक क्षणासाठी लढतंय अन कुणी कुणी क्षण अन क्षण नुसतं रेटतंय..
ह्या क्षणाचं ‘सोनं’ करण्याचा क्षण हाच…
मिळालाय तर असा घालवू नका…

You are really BLESSED to have it…

Last to last week-end ला आई-पप्पा येउन गेले (मला माहेरी जायला जमत नाही म्हणून शेवटी तेच आले इकडे :(   ).
२ दिवसांकरता आले पण त्यांच्या प्रत्येक कृतीतून त्यांची कळ-कळ, काळजी जाणवत राहीली. लेकीच्या संसाराच्या घडीवर अगदी मनापासून लक्ष, धाव-पळीमुळे वाटणारी काळजी, लेक कुठे कमी पडतीये/कुठे गोष्टी अजून व्यवस्थित करता येतील ह्यावर कानमंत्र, आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिलेल्या सूचना…आणि बरंच काही.
येतांना मला वेळ नसतो म्हणून सोबत घेउन आलेल्या शिदोरीत काय काय नव्हतं, रोज लागणा-या जिन्नसांपासून वर्षभर लागणा-या लोणच्यापर्यंत. वर “कशाला एवढी दग-दग म्हटलं” की “होईल तोवर करत राहूत” असं उत्तर. खरं तर ह्या वयात त्यांनी एवढं पुन्हा झिजावं असं अजिबात वाटत नाही, पण ते ऐकणा-यातले नाहीत. अन ते का ऐकत नाहीत हे कदाचित मला आज कळणार नाही.
पप्पांचा भर आरोग्यावर होता तर आईचा त्याबरोबर घरातल्या प्रत्येक गोष्टीच्या management वरही. म्हणून kitchen मध्ये सगळ्या प्रकारची आवश्यक तेवढी भांडी असूनही तिला ठळकपणे areas of improvement जाणवत होते. तिची ही कळ-कळ पाहून तुळशीबागेत जायला ‘न’ आवडणारी मी तिच्यासोबत तिथे जाउन ४ प्रकारची तिच्या भाषेतली ‘अत्यावश्यक’ भांडी घेउन आले. अर्थात नंतर मलाही जाणवलं, अनुभव शेवटी अनुभव असतो. घर-संसाराच्या बाबतीत मी अजून fresher आहे. २ दिवस मी आईसोबत घर वेगळ्या angle नी ‘अनुभवलं’.

लग्नानंतर नवीन घराला, नवीन माणसांना मी ‘आपलं’ मानून एक नवीन आयुष्य सुरु करणं एक वेगळी गोष्ट झाली पण लेकीच्या लग्नानंतर तिच्या नवीन जगाला आई-पप्पांनी ‘आपलं’ मानून त्यात एकरूप होणं ह्याला खूप मोठं मन लागतं अन ते फक्त ‘आई-वडीलांना’ च जमतं.

त्यांच्यासोबतच्या नात्याचा नवीन पैलू मी त्यांच्या ह्या भेटीत अनुभवला. अन म्हणून आजवर इतक्यावेळा ह्या अन त्या कारणामुळे घर सोडतांना एकही टीप न गाळणारी मी ह्या वेळी ते परत गावी गेल्यानंतर घरी आल्यावर त्या टीपांना control करू शकले नाही. पण हे अश्रू बंध अजून पक्के करणारे होते म्हणून वाईट वाटलं नाही :)

त्यांना गावी जाउन आता २ आठवडे होत आले पण तरीही ते इथेच असल्याचा अनुभव रोज येतो: ताटात घेतलेल्या लोणच्यातून, नवीन घेतलेलं भांडं त्याची खरेदी सार्थ ठरवतं त्यातून, माझा वेळ वाचावा म्हणून आईने stock मध्ये सोलून ठेवलेल्या लसणातून अन थोडं तरी चालणं व्हावं ह्या त्यांच्या कळ-कळीखातर सध्या regular केलेल्या शतपावलीतून…

अन ह्या post मधून :)

‘आई’ अन ‘वडील’…आयुष्यात ह्यांना REPLACEMENT नाही…

Next Page »