RSS

चलते-चलते…

परवा राहुल द्रविडने retirement घेतली..आठवड्याभरापूर्वी बरीच जनता त्याने retirement घ्यावी म्हणून चर्चा करत होती. तीच जनता त्याच्या retirement ची news ऐकून खूप senti झाली. म्हणजे पार भूतकाळात जाऊन त्याच्या true gentleman असण्यावर आणि त्याच्या memorable innings आठवून त्यावर चर्चा, facebook वर status updates इति इति..थोडक्यात त्याने जे काही चांगलं केलं होतं त्याचं हे फळ..त्याच्या गुणांची पावती तो जाताना त्याला मिळाली. कारण आता तो नसणारे त्यामुळे त्याचं ‘असलेलं’ पण ‘विसरल्या गेललं’ महत्त्व त्याने bye म्हटल्यावर आठवणं आलंच..

आपल्या स्वत:च्या आयुष्यात डोकावून बघतानाही असे कितीतरी क्षण डोळ्यासमोर येतात.. शाळा, college सोडताना लागलेली अनामिक हुरहूर. लाख तक्रारी असल्या, group मध्ये कितीही रडलो company/job च्या नावाने, तरी सोडताना भयंकर emotional व्हायला होतंच! हजार आठवणी असतात. सगळं काही रोजचं असतं..आणि आता ते पुन्हा जगायला मिळणार नसतं. आठवणी तर सोबत असणारच, पण एक अख्खं जग मागे सुटणार असतं..

‘सोडून जाण्याचा’ हा क्षण कितीतरी गोष्टींना उजाळा देतो, वेगळीच घालमेल करून जातो जीवाची – व्यक्तही करता येत नाही अन लपवताही येत नाही.

कितीही त्रास झालेला असला तरी चांगल्याच गोष्टी जास्त प्रकर्षाने जाणवतात, पुन्हा-पुन्हा आठवतात.

शेवटचा श्वास घेतल्यावरही तसंच काहीसं. चांगल्या आठवणी मागे ठेऊन जाण्यासारखी समाधानाची दुसरी गोष्ट नाही. येणं-जाणं हे प्रत्येकाच्या नशीबी अटळ आहे, पण त्या दोघातला मार्ग स्वत:साठी तसंच इतरांसाठी सुकर होईल हे ज्याच्या-त्याच्या हाती असतं. Choice असतो available . म्हणून होता होईस्तोवर विचार-वर्तन-वाणी चांगली ठेवावी. कुणी आठवण काढली तर त्याच्या चेह-यावर आनंद/समाधान झळकावा, आपल्या नुसत्या आठवणीने त्यांच्या कपाळावर उठणा-या अढ्यांच्या गुंत्यामध्ये गुंतलं की मुक्ती मिळणे नाहीच.

 
1 Comment

Posted by on मार्च 13, 2012 in Life

 

सोचा ना था :)

न बघितलेली ध्यानी-मनी नसलेली स्वप्न जेव्हा पूर्ण होतात तेव्हाचा आनंद वेगळ्याच category मधला असतो. पहिलं म्हणजे सगळं अगदी अनपेक्षित असतं. अपेक्षांचं ओझं अजिबात नसतं, स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठरलेले साचे नसतात. कोणते  पूर्वग्रहही नसतात. सगळाच jackpot!

थोडक्यात सगळं ‘अपेक्षा’ नावाच्या ringmaster भोवती घुटमळत असतं. असं व्हायला हवं, अमुक वेळी घडायला/मिळायला हवं. एक संपलं की दुसरं पुन्हा डोक्यात. ह्यांना तशी अनेक नावं असतात- ‘जबाबदारी’, ‘कर्तव्य’ , ‘अधिकार’ इति. इति. त्यामुळेच ह्या सगळ्या factors चा काहीही प्रभाव नसलेली ‘न बघितलेली स्वप्न’ प्रत्यक्षात उतरली की भारी types काहीतरी वाटतं. ती प्रत्यक्षात उतरत असताना आपण जी काही कर्म केलेली असतात त्यामागे ‘फळाची’ काहीच अपेक्षा नसते. निष्काम कर्म. एरव्ही असे करायला बरेच म्हणजे बरेच patience लागतात अन तसे केले तरी शेवटी कुठेतरी ‘मी’ हे केले , ‘मी’ होते म्हणून हे शक्य झाले हा अहं कायमचा त्या कर्माला चिकटतो. सगळं मुसळ केरात.

म्हणून, बरं असतं नकळत हातून चांगलं घडणं. करणाराही हलका अन ज्याच्यासाठी केलं तोसुद्द्धा.

You just realize- things are just as perfect as they should be! And such feeling is amazing, renders you speechless.

Sometimes, Life dreams of us instead of we dreaming of Life :)

 
5 Comments

Posted by on मार्च 5, 2012 in Life

 

इतनी शक्ती हमें देना दाता…

एका लग्नानिमित्त गावी जाणं झालं, म्हणजे खूप वर्षांनी गावाकडचं लग्न attend करण्याचा योग आला. अन जे बघायला, अनुभवायला मिळालं ते एकूणच विचार करायला लावणारं होतं. विशेषत: बायकांचा लग्नात मिरवून घेण्याच्या पद्धतीत झालेला बदल. साधं-सरळ, सहज वाटेल असा काही नाही. नखशिखांत पेहरावात अन वावरण्यात T.V. serials आणि चित्रपटांचा पूर्ण प्रभाव जाणवत होता. अर्थात अनुकरण करण्याला हरकत नाही पण अंधानुकरणाला काहीतरी मर्यादा असावी. सोज्वळपणा, सात्त्विक भाव शोधावा लागत होता. शहरातही ह्या गोष्टी शोधाव्या लागतातच.

हा बस एक लहानसा प्रसंग होता, पण विचार केला – गाव म्हणा किंवा शहर, साधे-सरळपणा, स्वच्छ मन, निरागसपणा हे सगळं दुर्मिळ होत चाललंय. असंही म्हणता येईल की आपापला दृष्टीकोण आहे, आयुष्याला साधं-सोपं ठेवणारे हे गुण आजही अनुभवायला मिळतात. असेलही. पण ‘दुर्मिळ’ झालेत हे नक्की. चेहऱ्यावरचे खोटे मुखवटे अन मुखवट्याआडचे खरे चेहरे ओळखता येणं कठीण. अन ह्या दुविधेमुळेच विश्वास-अविश्वास असा नवीन गोंधळ निर्माण होतो.

पूर्वीचे लोक दिलेल्या शब्दाखातर वाटेल ते करत होते, अन आज शब्दाला किंमत खूप कमी. त्यातूनच वाढत जाताय मोठ-मोठे, न पटणारे अन सुन्न करायला लावणारे गुन्हे, फसवणुकीचे प्रकार. स्वार्थ, लालसा, भरकटलेले विचार दिवसेंदिवस अनेक आयुष्य उद्धवस्त करत चालले आहेत. समोरच्या जीवाचा क्षणभरही विचार न करता त्याच्यासोबत खेळलं जातंय. अन तिथे लहान-मोठा, स्त्री-पुरुष, तरुण-म्हातारे असा कुठलाच भेद केला जात नाही. सद्सद्विवेकबुद्धी पूर्णपणे गहाण ठेवून सगळं काही चिरडलं जातं. २ दिवस त्यावर चर्चा, राग-संताप होतो, अन नंतर सगळं जैसे थे. सगळंच abnormal . ‘मन’ मरत चाललीयेत.

आपले आजी-आजोबा, आई-वडील ह्यांच्याकडून आपण ऐकत आलो आहोत (अन अनुभवतही आलो आहोत) तत्त्ववादिपणा, सारासारविचार, सचोटीचे क्षण-किस्से, त्यांचे हे गुण आपल्यात त्यांच्याच कृपेने आलेत. ती पुण्याई, आपले स्वत:चे असे त्यात काहीच कर्तृत्व नाही. पण ह्या गुणांना जपता येणं अन रोजच्या आयुष्यात हिमतीने अन patience ने follow करणं तेवढा सोपं नाहीये उरलं. अन तीच खरी कसोटी. येथेच स्वत:ला सिद्ध करता यायला हवं. मागच्या पिढ्यांकडून आलेली मूल्यांची, तत्त्वांची शिदोरी जपणं अन ती पुढच्या पिढीत आपसूकपणे बिंबवणं हे कर्तव्य प्रत्येक पिढीने पार पाडायलाच हवं. जीवनात शाश्वत राहणाऱ्या ह्याच गोष्टी आहेत. बाकी किती संपत्ती जमवली अन पुढच्या पिढीला दिली ह्याला काहीच महत्त्व नाही. सगळं काही क्षणभंगूर. घरा-घरातून, शाळांमधून ‘माणसं’ घडायला हवीत, पैसा छापणारी अन मिथ्या प्रतिष्ठा वाढवणारी यंत्रं नव्हेत.

सत, त्रेता, द्वापर, कलि असली युगे असतीलही. पण म्हणून जे-होतंय-ते-तसंच-होणार-अन-होऊ-द्यावं हा विचार करून सगळं प्रत्येकवेळी सोडत राहायला नको. हा आपला प्रांत नाही असं मानून स्वत:ला निर्बल, दुबळं करायला नको. आपल्या परीने जेवढं चांगलं करता अन रुजवता येईल ते तरी करायलाच हवं. वैचारिक बदल महत्त्वाचा, बाकीचे मग आपोआप घडत जातील. सुरुवात महत्त्वाची, कुणीतरी पुढे नेईलच चांगल्या गोष्टी.

बस हा मार्ग निवडलेल्या सगळ्यांना ‘त्याने’ बळ तेवढं देत रहावं, निराश न होता सतत पुढे जात राहण्याचं…

 
13 Comments

Posted by on फेब्रुवारी 22, 2012 in Life

 

सफ़र में धूप तो होगी..

सहजा-सहजी एखादी गोष्ट मिळणे आणि तीच गोष्ट ठेचकाळत, धडपडत ‘मिळवणे’ ह्यात खूप मोठं अंतर असतं. थोडक्यात म्हणायचं तर त्या गोष्टीची खरी किंमत म्हणा किवा महत्त्व म्हणा, धडपडल्याशिवाय कळत नाही. खूप कमी लोक असतात ज्यांना सहज सगळं उपलब्ध होऊनही ह्या सत्याची जाणीव असते.

एवढा क्लिष्ट विचार करण्याचं कारण? fresher मंडळी join झालीये ४-६ महीन्यापूर्वी, सगळेच जवळपास campus selection मधून आलेत. त्यातली एक आमच्या team मध्ये ‘assign’ झाली. वातावरणाशी जुळू देत म्हणून सुरुवातीला थोडं दमाने घेतलं. नाही म्हटलं तरी college life चा feel जायला थोडा काळ लागतोच. तर हळू हळू जरा लहान-सहान assignments दिली, वेळेचं वगैरे बंधन नाही, त्यातून त्यानी काहीतरी शिकावं आणि तयार होत जावं एवढाच प्लान. अन ह्या सगळ्यात जे काही अनुभवायला मिळतंय ते निव्वळ अनपेक्षित आहे. अमुक-तमुक technology मध्ये मला काम करायचं नाहीये, त्यात मला interest नाहीये अशी सुरुवात झाली. अजून लहान आहेत म्हणून जरा वेळ काढून समजावून बघितलं, सुरुवातीला कसं सगळं कठीण वाटतं, एकदा जमलं की मग कसं interesting वाटेल इति. इति. पण नाही म्हणजे नाही..पुढचा response होता:”मला नाही वाटत की माझा ह्यात interest develop होईल म्हणून!” आता मात्र खरच चाट पडले मी.

हो, म्हणजे आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे किंवा काय करायचे नाहीये ह्याची clarity नक्कीच असावी, पण एवढी? म्हणजे अजिबात प्रयत्न करायचा नाही अन आधीच शस्त्र टाकायचे? इच्छा नाही की करायचा कंटाळा? सहज job मिळणे एवढे कठीण नको ते बळ देते? अन मग खरच वाईट वाटतं, बाहेर कितीतरी ख-या अर्थाने ‘लायक’ पोरं-पोरी रोज खस्ता खातायेत, रोज सकाळी उठलं की नव्या दमाने लागायचं, माहीत नसलेल्या शहराला आपलं बनवत सगळे रस्ते पिंजून काढायचे..तास-अन-तास वाट बघत interview च्या process मधून जायचं, rejection पचवायचं अन त्यातूनच धडा घ्यायचा..पुन्हा स्वत:च स्वत:ला सावरायचं, घरच्यांना धीर द्यायचा अन त्यांच्याकडून घ्यायचाही, सोपं काहीच नसतं त्या काळात..रोज पडायचं अन मग उठून पुन्हा चालायला लागायचं..ही सगळी धडपडच तर शिकवून जाते खूप काही..
नकळत आयुष्यभराचा धडा देऊन जातात हे अनुभव..अन तेच तुम्हाला जमिनीवर ठेवतात, भरकटू देत नाहीत. संघर्षासाठी बळ लागतं तसं संघर्षातून बळ मिळतंही.

त्यामुळेच अश्याप्रकारच्या दिव्यातून प्रत्येकाने एकदा तरी जायला हवं. स्वत:च स्वत: ला घडवण्याचा तो एक भाग ठरतो..अन ह्यात स्वयंप्रेरणेचा जो काही कायमचा ठेवा गवसतो त्याचं महत्त्व वेगळंच. अशी प्रेरणा तुम्हालाही ‘चालतं’ ठेवते अन इतरांनाही नकळत मार्गदर्शक ठरू शकते.

थोडक्यात काय तर ‘मूळं’ पक्की होत जातात, कुठल्याही वादळात टिकून राहण्यासाठी..

निदा फाज़लींच्या ‘सफ़र में धूप तो होगी’ मधल्या ह्या ओळी म्हणूनच खूप काही सांगून जातात

“हर इक सफ़र को है महफूस रास्तो की तलाश
हिफाज़तो की रिवायत बदल सको तो चलो..”

 
3 Comments

Posted by on नोव्हेंबर 29, 2011 in Life

 

शेंगा..टरफलं…

कॉलेज ला असतानाचा प्रसंग आठवला सकाळी..Engineeringचे शेवटचे वर्ष होते, झालं काय की होळी वगैरे खेळण्याची hostel मध्ये permission नव्हती..त्यामुळे प्रश्न नव्हताच.. तरी होत्या काही वल्ली मैत्रिणी, ज्यांनी ‘शेवटच’ वर्ष ह्या tag खाली अचानक आम्हाला surprise दिले..झाले, warden २-३ रूम सोडून राहायला होती..ओळीने  उभं केलं सगळ्यांना..झाल्या प्रकारची आम्ही सगळ्यानी माफी मागून घेतली अगदी मनापासून ..४ वर्षात आमची एकही  तक्रार गेलेली नव्हती म्हणून आम्हालासुद्धा जरा guilty वाटतच होतं, त्यामुळे म्हणलेलं sorry सुद्धा अगदी आतून आलेलं होतं..पण तिचं मन नाही भरलं तेवढ्याने..बोलली ‘शिंग फुटली काय ४ वर्षात!’ मग मात्र माझ्यातली सुप्त झाशी झाली जागी, झाप झाप झापलं मीच तिला (नीट शब्दात)..एवढंच पटवून दिलं की झाल्या प्रकाराची जर आम्ही कबुली देऊन मनापासून माफी मागतोय तर तुम्ही योग्य शब्दात काय ते झापा ना, तुमच्या बरोबरीने आम्ही उद्या बाहेरच्या जगात पाउल ठेवणार आहोत तेव्हा शिंग वगैरे बोचरं वाटतं..group मधल्या बाकी सगळ्या चकीत, माझं हे रूप त्यांनाही नवीन, त्यामुळे जे झाले त्यापेक्षा जे होतंय त्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता..

पण होतं ते खरं..शेंगा खाल्ल्याचं आम्ही मान्य केलं, टरफलेही उचलतो म्हणालो मनापसुन..

हे सगळं आठवण्याचं कारण…सकाळी सकाळी office मध्ये एकाने वस्तुस्थिती जाणून न घेता तोफा डागायला सुरुवात केली, सुरुवातीला उगाच का blame game वाढवा म्हणून मी शांततेने घेतलं..वाटलं कपातलं वादळ ठेवा कपात. पण अजूनच चेव चढला समोरच्याला..मग झाली ना माझ्यातली झाशी जागी..मी शेंगा कश्या खाल्ल्या नाही हे मोजक्या शब्दात दिलं पटवून…मग झालं शांत वादळ (आता शांत झालंय की ही वादळापूर्वीची शांतता आहे हे कळेलच मागे पुढे :) )..असो..

पण हे खूप common आहे..घर असो की office, नसते वाद चिघळवून मुख्य गोष्टीवरचा focus घालवला जातो..समोरच्याला मनापासून चूक मान्य असेल तर काय गरज आहे वाद वाढवायची..माफी मागून अन पुन्हा असं होणार नाही अश्या शब्दात माफ करून प्रश्न सुटत असतील तर मग बोचरे शब्द वापरून उगाच वादाचं chewing-gum का करायचं, कपभर पाण्याने विझणारी आग बंब भर पाणी लागण्याइतकी का उगाच भडकावायची?? तसंच समोरच्याचं खरच चुकलंय का ह्याची पण आधी खात्री घ्यावी करून, उगाच चालत्या गाडीत अंदाज न घेता चढून त्रास का करून घ्यावा ?

अन  चुकणा-याने ही लक्षात ठेवावे..
शेंगा खाल्ल्या असतील तर म्हणायला काही कमीपणा वाटायला नको …”मी शेंगा खाल्ल्या, उचलतो मी टरफले, पुन्हा कचरा करणार नाही!”
अन नसतील खाल्ल्या तर नीट शब्दात मांडा टरफले का उचलणार नाही ते..मात्र खाऊन, खाल्ल्या नाही म्हणू नका :)

Keep it simple silly :D

 
10 Comments

Posted by on जुलै 29, 2011 in Misc

 

जगण्याचा अर्थ कळे[ना]…

आळस, कंटाळा ह्यांचा पसारा खूप वाढलाय आजकाल, जो भेटतो तो वैतागलेला, कंटाळलेला; थोड्या फार प्रमाणात कमी-जास्त. पण negative energy चं प्रमाण वाढलंय वातावरणात. ५-६ वर्षापूर्वीचे आपण अन आजचे आपण, विश्वास बसत नाही, एवढं काही चोरून नेतं (अन तेही तुमच्या नकळत) एक routine आयुष्य तुमच्याकडून? जगाचे अन जगण्याचे वेग-वेगळे काने-कोपरे कळले की प्रवाहातले एक बनून जायला वेळ लागत नाही..ordinary life . स्पर्धा अन तिथे टिकून राहण्याची धाव-पळ प्रत्येकालाच वेळे-आधी म्हातारं बनवते आहे, ते ही पुन्हा नकळत! शाळा, कॉलेज, नोकरी, घर, लग्न, संसार ह्या मार्गाने जाणं जसं compulsory च आहे अन गेलात तरी तिथून करावयाचा प्रवासही एका ठराविक मार्गाने अन ठराविक साच्यातच करणं must आहे ही विचारसरणी नकळत खोल रुजलेली असते..खूप कमी लोकांना साच्याबाहेर विचार करायला जमतं अन त्यातूनही खूप कमी जणांना साच्याबाहेर जगायला जमतं…

म्हणजे साचेबद्ध जीवन जगणं सटर-फटर आहे असं म्हणायचं नाहीये मला..जे काही जगताय ते आतून अन समाधानाने जगलं गेलं पाहिजे अन तेच आज दुर्मिळ होत चाललं आहे, शांती हरवते आहे. दोन घडीचा वेळ afford करू शकत नाही आज-काल कुणी कारणमीमांसा करायला..बस वाहत राहायचं..मग फोफावत जातात तऱ्हे-तऱ्हेची शिबिरं, counselling अन महागडी outings..म्हणजे हे सगळं मनापासून होत असेल तर प्रश्न नाही पण काही जण शांती-समाधान वगैरे मिळवण्यासाठी जातात अश्या ठिकाणी. असं ठरवून नाही ना मिळत ह्या गोष्टी, त्या रोजच्या आयुष्याचा एक भाग असायला अन व्हाव्या लागतात.

शेवटी कसं जगावं ही सुद्धा एक वृत्ती असते , रडत-पडत की हसत-खिदळत. पळत्याच्या पाठी धावत राहिलं तर रस्ता कधीच संपणार नाही, अन रस्त्याला फाटे तर फुटत राहणारच..बरं पळायचंच आहे तर पळा पण किती, का अन कसं एवढं ठरवून पळा. म्हणजे हे सगळं जमणं तसं सोपं नाहीये पण खूप कठीणही नाहीये , जमवायचं म्हटलं तर जमतं सगळं. पूर्वीचे लोक होतेच ना सुखी-समाधानी आज एवढ्या सोयी-सुविधा नसताना, कारण प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठीचा प्रवासच त्यांना घडवायचा..आज-काल प्रवास होतोच कुठे, नुसतीच धाव-पळ जी आयुष्य काय आहे हे कळायच्या आतच सर्व काही घेऊन जाते.

परवा office मधून निघायला आधीच खूप उशीर झालेला, तश्यात tyre puncture, झालं! चीड-चीड सुरु, सगळ्या जगात आपल्यालाच कसा त्रास आणि tensions आहेत इति इति पोकळ विचार. puncture काढणारा मुलगा जेमतेम १५ वर्षाचा असेल, एकदम हसमुख. त्याची परिस्थिती, काम करण्याची जागा काहीच चांगल्या condition मध्ये नव्हतं तरी हा सर्व-सुखी. मन लावून काम करतोय, अजिबात अढी नाही त्रासाची. कुठून शिकला असेल तो हे सगळं? शाळेत जातो का हे विचारल्यावर शांतपणे ‘नाही’ एवढंच म्हणाला. नंतर मलाच वाटून गेलं की मी उगीच कीडा सोडून त्याचं आयुष्य अस्वस्थ केले की काय. पण तो त्याच्या मूळ स्वभावानुसार पुन्हा निर्विकार..

किती, कसं अन का पळायचं आहे ह्याची calculations त्याला अगदी clear होती वाटतं.
त्या दिवसापासून रोज office ला येता-जाताना त्याच्या दुकानवजा टपरीवर लक्ष गेल्याशिवाय राहत नाही, स्वत:ची calculations पडताळून बघता येतात त्यानिमित्ताने..

 
4 Comments

Posted by on एप्रिल 20, 2011 in Inspirational, Life

 

[Un]common sense…

प्रसंग १:
सकाळची वेळ, office ची pantry ह्या वेळी सगळ्यात जास्त गजबजते..तश्यात दोन मुली pantry च्या दाराच्या अगदी मधोमध उभ्या..बरं संवाद तरी काय? पहीली दुसरीला तिच्या ड्रेसबद्दल विचारते “ही बांधणी print की गढवाली?”, दुसरीला त्यातलं विशेष काही माहीत नाही..त्यामुळे उगाचच सुरु चर्चा..बाकी लोक ताटकळत, आतले आत अन बाहेरचे बाहेर..कित्येकांना असतील महत्त्वाची कामं आपापल्या जागेवर जाऊन..

प्रसंग २:
वेळ दुपारची, स्थळ पुन्हा office, लोक इतक्यातच जेवण आटोपून पुन्हा आपापल्या जागी परतलीत, सगळीकडे शांतता..अन अचानक जोर-जोरात गप्पा, हसणं-खिदळणं सुरु झालं, work-hall मध्ये ठेवलेल्या सोफ्यावर ४-५ मुलींचा घोळका येऊन बसला..अन विषय तरी काय? “मेहेन्दीमे अंडा डालो तो मस्त होते है बाल” दुसरी: “अर्रे दही डालो, उससे भी मस्त होते है”..अन इति इति ..माझ्या शेजारी बसलेला colleague अन मी हैराण..नेमके आमचे cubicle त्या सोफ्याशेजारी..२ वेळा त्यांच्याकडे कटाक्ष टाकून ही no use ..ज्ञान पाजळा, नाही कोण म्हणतंय, पण जरा आजू-बाजूचे भान ठेवा..

प्रसंग ३:
पुन्हा office, एक meeting सुरु आहे (महत्त्वाची असू देत किवा नसू देत), एकीचा mobile वाजला..वाटलं silent करून ठेवेल पण कसलं काय..madam SMS-SMS खेळत बसल्या…१५-२० मिन्स, काही वाटलं नसतं जर mobile च्या keypad चा आवाज झालं नसता, मोठा अन irritate करणारा आवाज होता..अक्षरश: सगळ्यांचा कटाक्ष टाकून झाला, पण दृष्टी हरवलेल्यांना काय दिसणार..

प्रसंग ४:
आहेत काही नमुने office मध्ये, seniors आहेत म्हणायला..पण जेव्हा कुणी काही निमिताने sweets किंवा chocolates आणतं सगळ्यांसाठी, हे दोघं निवांत भर-भरून खिसे अन drawers भरतात!(LITERALLY)..देणाऱ्याने न राहवून “अजून खूप लोक राहीलेत” म्हणलं तरी घेणं-देणं नाही, पुन्हा संध्याकाळी निघताना काही शिल्लक आहे की नाही हे बघायला येणार अन असेल-नसेल ते सगळं न विचारता उचलून नेणार..! शब्द नाहीत..

प्रसंग ५:
स्थळ: Office cafeteria, उपवासाच्या फराळाचं counter, genuine उपवास करणारे रांगेत उभे असताना उपवास नसलेली ४-५ डोकी(?) रांगेला तडा देत खरकटं ताट घेऊन उपवासाचं काय बरं घेता येईल ह्याचा विचार अन मग नंतर कृती करत शिरली, बरं वाढून घेताना चमचा ताटातल्या आधीच्या जेवणाला लागून आपण तो उष्टा करतोय एवढं कळण्याइतका धीर नाही..

असे बरेच काही अनुभवायला मिळते, मान्य व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे..पण हक्कांना कुठे अन कसं अन कुठल्या limit पर्यंत वापरावं ह्याची तरी जाणीव ठेवा..सार्वजनिक ठिकाणी वावरताना दुसऱ्याला त्रास होणार नाही एवढी काळजी तर नक्कीच घेता येण्यासारखी आहे, पण एवढा विचार करतंय कोण? ह्या लोकांना तिथल्या तिथे त्यांची चूक जाणवेल अशी कृती करायलाही आपण ४ वेळा नको तितका विचार करतो..पण हे लोक आपल्याच दुनियेत असतात.अतिक्रमण अन अतिरेक अश्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी..

उथळपणे वागताना खोलात शिरायची गरज असतेच असं नाही पण खोलात शिरण्यासाठी आधी उथळपणा भेदायलाच लागतो ..

 
8 Comments

Posted by on एप्रिल 14, 2011 in Life

 

आलीया भोगासी…

“कामवाली बाई” नेहमी जिव्हारी लागणारा जिव्हाळ्याचा विषय असतो.
पहीला प्रश्न: मिळेल का कुठे?
नंतर: कशी असेल अन package किती द्यावे लागेल?
उत्तर काहीही असले तरी गत्यंतर नसणारे प्रश्न: दांड्या किती मारेल? वेळेवर येईल का? काम नीट करेल का?
अश्या सगळ्या steps पार केल्यावर सुरु होतो रोजचा खेळ..
जुळवून घ्यावं लागतं, म्हणजे सासू/सूनेचं नातं असल्याप्रमाणे..
कुठे अन कशी ठिणगी पडून भडका उडेल सांगता येत नाही..

नवीन घरात shift झाले अन शोधली एक बाई..पहील्या भेटीतच click झालं: प्रकरण जरा सरळ नाही..नखरे झेलण्याची सवय करून घ्यावी लागेल, अन जरा दमानेही घयवे लागेल..
खेळ सुरु..
बाई येणार अन जाणार..
मनाला येईल तसंच काम करणार: valid सूचनांना entertain केले जाणार नाही..
दांडी? वाटेल तेव्हा..
रोजची वेळ? Flexi-time तिच्या वेळेप्रमाणे जुळवून घ्या..
कामही एकदम चाल-ढकल..
तरी म्हटलं, जाऊ देत..सुरुवातीचे काही दिवस जरा adjust होण्यात जाऊ द्यावेत..समोरची व्यक्ती समजून घेते म्हटल्यावर जरा बदल होईल..
पण नाही, जाणीवेचा गाव माहीत नाही तिला..

join करून २ महीनेही नाही झाले अन बाईनी आज सकाळी फर्मान सोडले: “पगार वाढवून द्या १०० रु. नी, परवडत नाही”
अवाक मी: “आधीच व्यवस्थित आहे पगार, लगेच नाही वाढवता येणार..”
ती: “ते काही नाही, सगळीकडे जास्त आहे”
मी: “घरात आम्ही फक्त ३ माणसं, भांडी/काम पण खूप कमी असतं, बरोबर आहे सध्याचा पगार”
आवाज चढलेली ती: “नाही नाही, ५० तरी वाढवाच”
(आता मात्र चीडूनही शांत असलेली) मी: “नाही, इतक्यात तरी जमणार नाही”
बाईंचा आवाज बंद, म्हणजे समजून घेणे की महीना संपल्यावर बाई येणार नाहीत..
नको येऊ देत, पैसे थोडे-फार वाढवलेही असते पण बाईंचं काम तेवढं worth ही नाहीये..
हवे तेव्हा पैसे वाढवून देऊन चुकीचे संकेत द्यायचे नाहीयेत मला..

ती गेली काम आवरून, पण माझ्या डोक्यातून निघायला तयार नाही..

काय पण मजेशीर गोष्ट आहे:
काल संध्याकाळी भांडी लावताना नुसती नावाला घासलेली/धुतलेली भांडी बघून मी ठरवलं होतं, उद्या बाईना जरा समजवून सांगावं लागेल..
सकाळी ती आल्यावर बोलणार होते तितक्यात वाटलं “जाऊ देत, कशाला तिची सकाळ (अन त्या-योगे पूर्ण दिवस) खराब करायचा? बोलूया नंतर, तिलाही चार घरची कामं अन स्वत:च्या घरचे ताप असतील”

अन ती अशी बेदीक्कत माझी सकाळ, दुपार, संध्याकाळ खराब करून गेली :)

मी पण कुणाकडून अपेक्षा ठेवतीये..
त्यापेक्षा तयारीला लागायला हवं..
थोड्याच दिवसात आता “नवा गडी, नवे राज्य..”
आलीया भोगासी..असावे सादर!

 
2 Comments

Posted by on मार्च 30, 2011 in Misc

 

जाणीव…

एखादं काम (लहान असू देत किवा मोठं), धाकामुळे केलं जातं किवा जाणीवेतून
जाणीवेतून केलं तर दोघांना समाधान – ज्याच्यासाठी केलं त्याला अन ज्याने केलं त्यालाही..
जाणीव त्या कामाचं ओझं कमी करते तर धाक त्याला नको तितकं असह्य करतो..
जाणीव त्या कामाने ज्याला हात-भार लावला त्याच्याबद्दलचा आदर दर्शवते (अन तसंच करणा-याबद्दलही आदर निर्माण करते) तर धाक उपकाराच्या भावनेला खत-पाणी घालतो..
जाणीव आपलेपणा वाढवते, धाक एकटेपणा..
जाणीव मनापासून असते;जास्त काळ टिकणारी , तर धाक वर-वरचा; रात गई, बात गई..
जाणीव निरीक्षण शिकवते, धाक गणन..
जाणीव नेते सकारात्मकतेकडे, भीती गिरवते नकारात्मकतेचे धडे..
आज-काल कमी होतं मात्र असं…
जाणीव स्वत:ची, घराची, देशाची, जगाची, निसर्गाची..किंवा अजून कशाचीही..
मी का करू? मी एवढंच करणं अपेक्षित आहे..
आयुष्याचा पाया निर्माण करणा-या बालपणापासून हे भूत मानगूटीवर बसतं – उदा. अभ्यास: जाणीवेपेक्षा धाकातूनच जास्त केला जातो..अन मग होत जाते सवय सगळं काही उथळपणे करण्याची..मूळांना अशी दल-दलीची सवय झाल्यानंतर पोरांकडून धाक दाखवून पंख लाऊन उडण्याची अपेक्षा करणा-या पालकांना दोष तरी द्यायचा कसा.. कुणाच्याही गावी ‘जाणीव’ नाही, काय चाललंय अन का चाललंय..निरीक्षण नाहीच..नुसती गणती करायची, गणती घड्याळ्याच्या ठोक्यांची, आल्या-गेल्या दिवसाची, स्पर्धा-परीक्षांची, मार्क्सची-स्कोरची, पहिल्या/दुस-या/तिस-या क्रमांकाची…
शांत बसून विचार करायला वेळ आहे कुणाला..कुणीतरी पुढे जाईल हा ‘धाक’ स्वस्थ बसू देत नाही..एवढं उथळ होऊन जातं सगळं की ‘धाका’ चीही ‘जाणीव’ उरत नाही..मग होत जातं सगळं स्वैर..
अन बरंच काही..
फार सोपं अन फार कठीणही आहे, जाणीव असणं अन ती पेलणं..ती एक साधना आहे अन साध्यही..ज्याला जमली त्यालाच जमली

 
5 Comments

Posted by on मार्च 22, 2011 in Life, Misc

 

पुनर्जन्म…

ह्म्म्म…एक काळ लोटलाय इथे लिहून…म्हणजे गेल्या काही दिवसात इतरांनी विचारण्यापेक्षा मीच स्वत:ला कितीदातरी हा प्रश्न विचारला आहे…”आजकाल(?) काही लिहीत नाहीस?” का वगैरेचा विचार करायला गेलं तर समाधानकारक असं उत्तर अजूनही मिळालं नाहीये, मध्येच एकदा वाटलं की writers’ block म्हणतात तसला काही प्रकार असेल, पण ‘writer’ वगैरे म्हणवून घेणं म्हणजे जरा अतिच झालं…बरं, उगाच प्रयत्न करून, ओढून-ताणून लिहीण्यात ही काही राम नाही..(आताही तसंच काहीसं होतंय की काय अशी शंका येतेच आहे)

अवघड आहे खरं, आतून शांत वाटत नाही तोवर मनापासून मनातलं काही उतरत नाही…आणि मग कळतंय ‘आतल्या’ शांतीबद्दल विचार करायला तरी कुठे वेळ मिळतोय सध्या…घड्याळाच्या काट्यावर सगळा हिशोब सुरु आहे…जमा तशी काहीच नाही, सगळा खर्चच खर्च…झोपताना कितीला उठायचा हा हिशेब, उठल्यावर सकाळच्या ‘tasks’ चा हिशेब: डबा, आवरा, ट्रेन पकडा, office गाठा अन office गाथा इति, office मधला हिशेब न केलेलाच बरा, निघताना पुन्हा पुढचा ताळेबंद..गाडी, बनवायचं काय रात्रीच्या जेवणात अन असतंच पुन्हा कामाचं लहान-मोठं शेपूट, लहान असलं तर मानायचा त्यातला त्यात आनंद…काय पण आनंदाचे निकष झालेत! हसावं की रडावं कळत नाही..हा हिशोब काही जमत नाही…’एक दिवस’ ह्या एककात सध्या सगळे calculations, हीच झाली चौकट.., scope थोडा वाढतो महिना-अखेरीस किवा सुरुवातीला, जेव्हा monthly बिलं विचारशक्तीला जरा वेगळा वाव देतात..अन त्याहून पुढं जायचं म्हटलंच तर मग आहेत घराचे EMIs, ५ वर्षांनी स्वत:ला कुठे बघतेस ह्या प्रश्नाचं ५ वर्षापूर्वीच अन आजचं उत्तर ‘उत्तर-दक्षिण’ ध्रुव…आता कुणी विचारलं तर पहिलं डोक्यात येतं ‘home loan nil करायचं!!!!’ काय पण महत्त्वाकांक्षा :( … एवढं बदलतं चित्र?

५ वर्षापूर्वी जग बदलू शकण्याची उमेद, आज स्वत:चा mood बदलण्याचीही मारा-मार..

Priorities एवढ्या बदलतात? Rather आपण एवढे वहावत जातो त्यांच्यासोबत? ह्या प्रश्नाला उत्तर नाही सहज, प्रतिप्रश्न मात्र हजार आहेत…त्यात शिरायला नकोच…एक एक प्रतिप्रश्न म्हणजे excuse , स्वत:ला नको ते समजावण्याचा..आहे खरं depressing, त्याला justification नाही..पण असल्या (-.-) ग्राफ मध्ये (+,+) पण खूप आहेत…विचार केला नव्हता अश्या ब-याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या…चांगली ‘लोकं’ भेटलीत आजवरच्या धावपळीत ज्यांनी वर मांडलेला हिशोब सुसह्य बनवला…’भौतिक’ म्हणा हे सारं पण it counts..’जगण्याची जाणीव’ जीवंत आहे तोवर ताप नाही..असं म्हणून over-optimistic होत नाही…पण at least असं म्हणून नको त्या निराशावादासून लांब तरी राहता येतं..

तेवढीच महत्त्वाकांक्षांची उजळणी..अन त्यायोगे पुन्हा एक पुनर्जन्म…स्वत:चा :)

 
5 Comments

Posted by on नोव्हेंबर 18, 2010 in Life, Misc

 
 
Follow

Get every new post delivered to your Inbox.