सध्याचा project संपला, आता नवीन assign झालाय…
पुन्हा relocation, नवीन जागा, नवीन माणसं…
खरं तर 3 वर्ष झाले ही company join करून, पण join केल्यापासून एकाच building मध्ये अन एकाच floor वर होते..सगळे चेहरे,meeting rooms, cubicles ओळखीचे..
आता जागेसोबत जग बदलणार…
असंच काहीसं किंवा ह्याहूनही जास्त emotional व्हायला झालं होतं ह्या आधीची company सोडतांना..
हम्म.. Reliance.. DAKC.. पहीला job, पहीली company… त्यामुळे अजूनच स्पेशल..
हजार आठवणी जुडलेल्या प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीसोबत …
विसरता विसरल्या जात नाही तिथला शेवटचा दिवस अन esp तो क्षण जेव्हा ID card परत केलं होतं…
एका ओळखीचा, अस्तित्वाचा अंत..
तिथल्या जगातली ओळख..तिथल्या जगाचं अस्तित्व…gate च्या बाहेर शेवटचं पडतांना मागे वळून बघायची हिंमत झालीच नाही..rather केलीच नाही..
आजही मुंबईला जाणं झालं की पनवेल ते कोपरखैरणे रस्ता सगळं काही जसंच्या तसं डोळ्यासमोर आणतो…
सगळं जुनं झालंय…आठवणी मात्र अजूनही नव्याच…
किती तरी अशी लहान-मोठी जगं मागे सुटून गेलीयेत अन अजूनही सुटतायेत..
शाळा, कॉलेज, पहीली company पहीला/दूसरा/तीसरा project/team…बरंच काही…
अन सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा असल्या कधी काळी ‘तुमच्या’ असलेल्या जगात तुमचं जाणं होतं अन भोवताली कुणालाच हे जग कधी काळी ‘तुमचं’ होतं ह्याची अजिबात जाणीव नसते…ओरडून सांगावसं वाटतं पण त्यासाठीही आपण आपले उरलेले नसतो…
…..
सगळेच बंध शब्दात व्यक्त करता येत नाहीत…हेच खरं…